Type Here to Get Search Results !

*महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सज्ज*



        मुंबई : (प्रतिनिधी) : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (IMD) कडून दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


                  पावसाचा अंदाज :


   कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे व्यापक पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता.


     मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पूरस्थिती उद्भवू शकते.


     घाट व लहान नद्यांच्या परिसरात अचानक पूर (Flash Flood) व भूस्खलनाचा धोका असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.



               पूर्व तयारी व उपाययोजना :


   सर्व जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवणार.


   शहरांमध्ये पाणी उपसा पंप व आवश्यक यंत्रणा तैनात करण्यात येणार.


    विज व रस्ते पायाभूत सुविधांची पाहणी करून दुरुस्ती पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.


   धरण नियंत्रणावर विशेष लक्ष देण्याचे आदेश.


    नागरिकांपर्यंत सूचना पोहोचवण्यासाठी SMS व सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे.



               नागरिकांसाठी सूचना :


    हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.


   धोका असलेल्या भागात जाणे टाळावे.


  पूरप्रवण क्षेत्रांपासून दूर राहावे.


      हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे व नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments